Friday 1 May 2015

उमगलेली सत्य

कधी कधी जगताना खुप संकटाना सामोरे जावे
लागते म्हणून का जगनेच सोडून दयायचे नसते.

मृत्यु हे जीवनातील भयाण सत्य आहे
म्हणूनच तर जगण्याला अर्थ आहे व जगण्यात
शर्थ आहे.

अमरत्वाचा वर अश्वधामा ने मिळवला होता
पण तो वर जास्त काळ फळाला आला नाही.
परमेश्वराकडे मरणाची भीक मागत आजही तो
गंगेकीनारी फिरताना आढळतो.

दुःखाचे काटे पायात बोचल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही.

कधी कधी आपण ज्याच्यावर विश्चास ठेवतो तीच माणसे आपला घात करतात, म्हणून आपण अवसान गाळुन बसायचे नसते, त्यातूनच नविन काहीतरी शिकायचे असते.

कधी कधी यश हाताशी येऊन निसटते
आणि आपण हताश होतो पण तिथेच न
थाबता नव्या उमेदीने पुन्हा भरारी घेतली
पाहिजे.

प्रेम ही मनात उमटनारी सहज सुलभ भावना आहे .पूर्वी प्रियकर आणि प्रेयशी मधे हातभर अंतर असायचे. हल्ली ते अंतर मिटत चाललय्
पूर्वी अंतर असूनही प्रेमात निष्ठा होती आणि हल्ली अंतर मिटूनही प्रेम टीकेनासे झालय. टीकणार तरी कसे प्रेयशीची आयटम झाली
आणि प्रेम म्हणजे टाइमपास झाला.

अँरेज मैरेज आणि लव मैरेज यामधील
यमधील फरक... जेव्हा पासून लव मैरेज मधे वाढ झाली तेव्हापासून काडीमोडाच्या फाइलीचा बोजा फॅमिली कोर्टात वाढला. कारण लग्न म्हटले की संसार आला आणि संसार करने म्हणजे चौपाटीवर बसून भेल खात चंद्र आणून देतो असे बोलण्या इतके सोपे नसते.

संसार नावाच्या रथास दोन चाके असतात.
एक नवरा आणि दूसरे बायको हा जीवनरथ ओढ़ताना मार्गात कितीही अडचणी आल्या
कितीही वादळे आली दुःखरुपी कितीही काचा
पायात रुतल्या तरी कुणीही डळमळायचे नसते.
न थकता न हरता अखंड चालायचे असते दोन चाकामधे आपुलकीचा प्रेमाचा व् विश्वासाचा घटट् दुवा असला पाहिजे तरच तो संसार सुखाचा होतो.

जगातील सर्व तीर्थस्ताने जरी फिरलो तरी जे समाधान आपल्या आईवडीलाच्या पायावर माथा रगडण्यात आहे ते समाधान कुठेही गवसनार नाही.
            
                               @ अशोक मटकर

No comments:

Post a Comment