Wednesday 23 December 2015

काय कमावलस ???

कुणीतरी मला विचारले
"काय कमावलस"???
मी म्हटले "'शब्द'"

त्याने म्हटले '"शब्द'"
क्षणभर थांबला तो
पुढे म्हणाला "काय
किमंत आहे या
"'शब्दांना'"??

मी म्हटले "हो ना
काहीच किमंत नाही
या '"शब्दाना'.".... मीही
क्षणभर  थांबलो

मी पुढे म्हणालो "नाही
या शब्दाची किमंतच
करता येणार नाही"???

कारण हे "'शब्द '"
'अनमोल' आहेत
तो म्हणाला " 'वेडा'
आहेस तू "

मी म्हटले "हो ना
आहे मी 'वेडा'
म्हनुनच सुचत सारं
अन् मनात दरवळत
हे 'शब्दरूपी'  वारं"

तो म्हणाला "कस
जमत तुला हे सारं"
मी म्हणालो "जमत
नाही आपोआप
जमुनच येत सारं"

मी पुढे म्हणालो
"जेव्हा मिळते
भावनेला साद
जेव्हा कोणी
मारतं आर्त हाक"

तेव्हा आपसुक
येते लेखणी हातात
आणि कागदावर
उमटतात हे
अनमोल  '"शब्द'"

                  @ अशोक शंकर मटकर

Tuesday 17 November 2015

माणसे

माणसे ही पुस्तकासारखीच असतात ,..
क्त त्याना वाचता आले पाहिजे
पुस्तकाचे विषय जसे वेगवेगळे
तसी माणसे ही वेगवेगळी असतात
पुस्तके जसी खुप काही शिकूउन जातात
तसे माणसे ही खुप काही शिकूउन जातात
                        
                                   @अशोक शंकर मटकर
                                   

Saturday 14 November 2015

कस जमतय तुला ??

कस  जमतय तुला ??
हे  सारे  करायला
दुःख पोटात लपऊन
चेहऱ्यावर हास्य फुलवायला

शिकवशील  का मला  तुझी
ही  वेगळी अदा जीच्यावर
झाले  माजे मनं  फिदा

तुझी  जगण्याची रीतच
निराळी येणार्या संकटाना
म्हणतस हट तिच्या मारी

नियतीने केला तूझ्या
पठित वार तरीही
आहेस तू  या जीवनरूपी
अश्वावर स्वार......

उमलनार्या भावनाना
मनातच दाबलस
भरलेल्या मोसमात
वैरागिपन स्वीकारलस

गुंतवलस स्वःताला कामात
इतके त्यामुळे बसत
नाहीत वेदनाचे  चटके

दुःखाने भरलाय मनाचा
काठ मग कशी आडवतस
या आसवाची वाट??.........

ही किमया जमते कशी तुला??
मला पण शिकव ना ही कला
कळू  नाही दिलास तूझा अंत
सांग ना कसा राहू मी शांत....

नाद मला माणस जपण्याचा
पुस्तका सारखं त्यांना वाचण्याचा
तू एक 'पुस्तक' ज्याचा शेवट एक कोड
कुणालाही न सुटणार ..... तूझ्याशिवाय

सांग !! ..ना
कस जमतय तुला ??
हे सार करायला
     
            @ अशोक शंकर मटकर
   

Friday 6 November 2015

हरवलय कुठेतरी ??

हरवलीय कुठतरी
ती कोबड्याची बांग आणि
जात्यावरील ओव्याची साद
तो पहाटेचा मंद वारा आणि
गोठ्यात वाजनार्या
दुधाच्या  धारा

हरवलीय कुठतरी
ती ताकाची घुसळण आणि
गरमागरम भाकरीवरी
मऊ लोन्याची पसरण
ती चुलीत पेटनारी आग
आणि ऊकाळनार्या दुधाचा
पसरणारा स्वाद

हरवलाय कुठतरी तो
पांढरा खाकी ड्रेस आणि
त्यावर तांब्याने मारलेली प्रेस
ते कापडी दफ्तर आणि
ती दगडाची पाटी
ती सुरुची झाडे आणि
गोड सूकडी

हरवलीय कुठतरी ती
गावाबाहेरची शाळा आणि
तो दोस्ताचा मेळा
तो  नदीचा  काठ आणि
निवस्त्र  केलेल्या
अंघोळीचा  थाट

हरवलय कुठतरी
ते मोठाले घर आणि
मोठे कुटुंब त्या
आजीच्या गोष्टी आणि
गोधडीतली उब

हल्ली तू मी आणि
दोन पिल्ल इतकंच
आहे मोजकच कुटुंब
अडगळ होतेय इतरांची

आजी आजोबाही
राहतात दूर
नातवडाच्या विरहाने
भरुन येतोय त्यांचा उर

गावाकडच्या घरात 
असतात ती पडून
समजावत मनाला की
हे ही दिवस
जातील उडून

परततिल पाखरे
पुन्हा घरट्याकडे
गजबजुन उठेल
घर सारे
त्यांच्या किलबिलाटाने

प्रेमाची व्याख्या ही
बदललीय आता
प्रत्येकाच्या वेगळ्याच कथा

हरवलाय कुठतरी
तो झुरनारा प्रियकर
हरवलीय ती ....
लाजनारी प्रेयसी

हल्ली जमाना
सेटिंगचा आलाय
सेटिंग नंतर
डेटिंग होते
डेटिंग नंतर
ब्रेकअप ही होते

मोजकीच नाती
चिरकाल टिकतात
अर्धी तर डेटिंगनंतर
विस्कटतात

पवित्र प्रेमाला चढलाय
वासनेचा माज कामातुराना
ना भय ना लाज

पूर्वी बसायची सात
जन्माची गाठ
आता लागते सात
महिन्यातच वाट

हल्ली सर्व मॉड झालेत
पहिल्यापेक्षा थोडे ऑड
झालेत म्हणतात की ही
काळाची गरज आहे...

म्हणून का रक्ताची नाती
दूर सरत आहेत???........
विचारा प्रत्येकाने आपल्या
मनाला काय हे खरच आहे

की हरवलोय कुठतरी??
आपण क्षणभंगुर सुखाच्या
शोधात कधीही न सूटनाऱ्या
मोहाच्या पाशात......
                 
                 @श्री . अशोक शंकर मटकर

आँसू

बहने दीजिये इन आसुओंको
इन्हे पलकों तले मत छुपाईए
नहीं तो ये नासूड बन कर इंतना
दर्द देंगे ....की उस दर्द को आप
सह नहीं पाएंगे |

अजीब है ये आसु ,गम के मातम
में तो बहते ही है...पर खुशियोंकी
सौगात में भी कहा रुकते है, बहना
ही है ,इनका काम कयोकि इनका
कनेक्शन सीधा दिल से होता है |

रोते हुए ही रखे थे इस दुनिया में कदम
माँ के आँखों से भी छलके थे ये आसु
बाप का भी दिल भर आया था
ख़ुशी के मारे

जब छूटता है अपनों का साथ
कोई छोड दे बीच सफर में हाथ
मिले वफा को बेवफाई ,प्यार में
मिले कोई हरजाई ..तो तडपते
दिल से निकलते  है ये आँसु |

जब मिले खेल में हार
जब लगे ना बेढा पार
जब की मेहनत अपार
जीवन के इस सफर में
तब छलकते है ये आसु

अरमानो से भरा होता है
ये दिल, सपनो में खोया
होता है ये दिल...पर हकिगत
में हर सपना पूरा नहीं होता है
किसीका तब न जाने
क्यों रो पडता है ये दिल ??

अपनों से तो है ही रिश्ता इनका
गैरो के लिए भी टपकते है कभी कभी
बस बात दिल को छुने वाली चाहिए
हर किसी से है , रिश्ता इनका .......
ना इन्हें कोई अपना गैर
जब दिल से गुजरती है कोई बात
वही थिरकते है इनके पैर |

इसलिए बहने दीजिये इन्हें
पलको तले ना छुपाईए इन्हे, नही
तो ये नासूड बन कर इतना दर्द
देंगे , की उस दर्द को आप सह
नहीं पायेगे |

                     @अशोक शंकर मटकर
                         08484049707

Friday 30 October 2015

क्षणाचा सोबती तू

क्षणाचा सोबती तू
का असा आलास
जीवनाच्या चित्रात
अर्धेच रंग भरून
गेलास

नाशिबाने थट्टा
याधिही मांडली
दुखाने तर पाठच
नाही सोडली

जणू पाचविलाच
पूजले होते सारे
कधीही न गवसनारे
आकाशातील तारे

बालपनीच शिकले
संसारातील तरतूद
हौसमौज विसरून
जगण हिरमसुंन

साधा लवलेशही
दिसला नाही जगास
अस तयार केलेले
मी स्वतास

स्वताबरोबर बाबांच
घर ही सावरल
बुडत्या नोकेला
किनारी लावल

कशीबशी शोधली वाट
केला पार अवघड घाट
तुझ्याशी मांडला
नव्या जीवनाचा थाट

वाटल आता होईल
सुरळीत सारे
टळतील नाशिबाचे
भोग सारे
गवसतील स्वप्नातील
तारे

होईल नवी पहाट
खुलेल भाग्याचे ललाट
येईल नवी आनंदाची लाट
मांडीन मी संसाराचा थाट

माझ्या वेड्या मनास
काय ठाऊक?? की
नियती करेल पुनः घात
सोडसील तू अर्ध्यावर साथ

काळाच्या धुक्यात तू
हरवलास...पार
शितिजापार निघुन गेलास
जाताना तुजा अंश
देऊन गेलास

आता आहेत आठवणी
फक्त उरी दाटलेल्या
मोकळ्या प्रतिमा
काळजात फाटलेल्या

कधी कधी हुंदके
अनावर होतात
मूक्या भावना
नयनातून ओघळतात

जगाकडे पाठ करून
धाय मोकलुन रडले
परत फिरताना हास्य
चेहर्यावर जपले

केलय मी स्वतास खंबीर
नको कुणाचा उसना धीर
कितीही संकटे येऊ देत
पाठ माझी घेऊन देत

बजावलय स्वताला
हरायाच नाही
रडायच नाही
फक्त लढायच

                    @ अशोक शंकर मटकर

(एका खंबीर व धैर्यशील स्त्रीस समर्पित)

Sunday 6 September 2015

मार्मिक

देवाच्या मंदिरात आपण दारु पिऊन जातो का??..तिथे जाऊन आपण सिगारेटचे झुरके घेतो का??...नाही ना??...का तर देवाचे मंदिर हे पवित्र स्थान आहे. तिथे अश्या गोष्टी करायला मनाई असते. आपल्या शरीरातही देवाचे अस्तित्व असते.फ़क्त ते अनुभवता आले पाहिजे . आपण मंदिराचे पावित्र्य जपतो ,शरीराचे पावित्र्य जपतो का??...
                                        @अशोक शंकर मटकर

रिस्क

जीवन में काफी  रिस्क है ..इसलिए LIC की किस्त वक्त पर भरवा दीजिये। भगवान न करे कभी अपने जीवन की लिफ्ट रुक गयी ..तो अपने परिवार की खुशियों में कोई कमी ना आ जाये...
                                   @अशोक शंकर मटकर

Tuesday 4 August 2015

स्माइल

लोग अपने स्टेटस में स्माइल वाला स्टिकर चिपका देते है। वह दिखने में भी अच्छा दिखता है, लेकिन वह स्माइल अपने चेहरे पर कैसे लाये । ...ऐसी स्माइल पाने के लिए दिल साफ़ और बंदा नेक होना चहिये।
           
                                     @ अशोक मटकर

Monday 3 August 2015

मित्र

मित्र
सखा सोबती
लंगोटी यार
एकमेकात असलेल
वात्रट प्यार

मित्र
मुक्त पाखरे
बेधुंद उडनारी
दूरवर पसरली
तरी कट्यावर
जमणारी

मित्र
कधी खोडी
कधी गोडी
क्षणात वैरी
क्षणात यारी

मित्र
खट्याळ वारा
बुडत्याचा सहारा
संकटातील साथ
एक वेगळीच
वहिवाट

मित्र
मैदानी खेळ
टपरीवरील भेल
पोहण्यातील चुरस
कोण आहे सरस ?

मित्र
शाळेला दांडी
घरच्यांना शेंडी
सिनेमाचा पास
मोकळा श्वास

मित्र
प्रेमाचा धागा
विपरीत त्रागा
एकच वादा
अखंड मैत्रीचा

             @ अशोक मटकर

माती

कधी कधी आपण आपल्या अंगावर थोडीजरी माती पडली ...तरी ती आपण पटकन झटकुन टाकतो..आपणास तिची कीळस वाटते ...पण कधी विचार केलाय का ...जेव्हा साऱ्या जगाला आपण नकोसे होतो ..सारे आपले नातेवाईक चार खांद्यावर उचलून आपणास घेऊन जातात ..तेव्हा ही मातीच आपणास तिच्यात सामाउन घेते ..आत्मा अंतराळात विलीन होतो आणि शरीराची जळून उरलेली राख या मातीत विलीन होते....
                                       @ अशोक मटकर

Monday 27 July 2015

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे माया, प्रेम म्हणजे विश्वासरूपी छाया.
प्रेम म्हणजे वात्सल्यरूपी आई, प्रेम म्हणजे मंदिरातला साईं.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे मैत्रीची साद, प्रेम म्हणजे आपुलकीचा हात.
प्रेम म्हणजे नादितील पाणी, प्रेम म्हणजे मंजुळ गाणी.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे यशोदेचा कान्हा, प्रेम म्हणजे दुधारू गाईला फुटलेला पान्हा. प्रेम म्हणजे चिमुकला पाहुणा, प्रेम म्हणजे लागलेला जीव्हाळा.

प्रेम म्हणजे काय ?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे राबनारा बाप, प्रेम म्हणजे कुणाच्यातरी विरहाने लागणारी धाप, प्रेम म्हणजे बहिणीची राखी,
प्रेम म्हणजे मास्तरानी हातावर मारलेली काठी.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय.
प्रेम म्हणजे पाठीचा भाऊ ,प्रेम म्हणजे शिवबाची जिजाऊ. प्रेम म्हणजे पुरवलेली हौस, प्रेम म्हणजे मनातला पाऊस.

प्रेम म्हणजे काय?...तर नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे सुटलेले घर, प्रेम म्हणजे पाखराची घरटयाकडे परतीची ओढ. प्रेम म्हणजे मनातली खंत, प्रेम म्हणजे न कळणारा अंत.

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय
प्रेम म्हणजे केलेला त्याग ,प्रेम म्हणजे मनातली आग.
प्रेम म्हणजे शुध्द भावना ,प्रेम म्हणजे काहीच कळेना

प्रेम म्हणजे काय? तर...नुसता नरमादीचा गेम नाय.

                                 @ अशोक मटकर

Sunday 26 July 2015

सावळे रूप

सावळे हे रूप
गोजिरे सगुण
पाहता हरपली
तहान भूक

एकादशी वारीला
येती भक्तगण
भजनी कीर्तनी होई
सारा आसमंत दंग

दुथंडली चंद्रभागा
आली त्याच्या चरणी
लागे भक्ताची रांग
त्याच्या द्वारी

युगायुगाचा हा महिमा
काय वर्णु याची ख्याती
तिन्ही काळांचा अधिपती
विठ्ठल सावळा

रंक आणि राव
नाही इथे भेदभाव
विसरुनी सारे होती
एक...जातपात

चरणावरी ठेविता माथा
दुःख हरले आता
लाभे मनास समाधान
त्याच्या मंदिरी..

साकडे घालितो वारकरी
ठेव सुखिसमाधानी....
दे अंगात बळ...
येइन चालत पायी
तुझ्या वारीला

असा हा देव जगात आगळा
ज्याचा ठायी संताचा गोतावळा
भक्ताची माउली दिनांची साउली
अखंड उभा विठेवरी ठेउनी कर
कटेवरी....
                        
                      @ अशोक मटकर

Wednesday 15 July 2015

तो आणि ती

       रात्रीचे नऊ साढेनऊ झाले असतील, तो कोल्हापुरला जाणार्या वॉल्वो बसची वाट पाहत दादर टीटी ला उभा होता . येणार्या बसला थांबउन त्याने जागा आहे का विचारले. समोरून बस कंडक्टर ने आहे म्हटले. त्याने कंडक्टर जवळ विंडो सिट आहे का विचारले कंडक्टर म्हणाला "साहेब एकच सिट रिकामी आहे ती पण कैन्सल झाली म्हणून, येताय तर चला." सुट्टीचा हंगाम होता त्यामुळे त्याने निदान बसायला मिळाले या वर समाधान मानून कंडक्टर ला टिकीट विचारले . कंडक्टर ने चारशे रुपये सांगितले . त्यावर तो म्हणाला "दादा मागच्या आठवड्यात गेलेलो साढेतीनशे घेतलेल". यावर कंडक्टर थोडासा वैतागुनच म्हणाला "साहेब सीझन आहे . एकच सिट राहिले जमतय तर बघा नाहीतर निघतो आम्ही, भाजीमार्केट सारखी स्थिती झालीय आम्हा टुरीस्ट वाल्याची कोन कितीहीलाही मागतो काय ईज्जतच नाय राहिली आम्हा राव" .कंडक्टर चे असे बोलने ऐकल्यावर तो थोडासा खजिल झाला. कुठल्या सीटवर बसु असे त्याने कंडक्टर ला विचारले.
               कंडक्टर ने त्याला रिकामी असलेल्या सिट कडे बोट दाखवत तिथे जाऊन बसा असे सांगितले.तो त्या सिटजवळ गेला. त्या सिटवर विंडो सिटजवळ त्याच्या समवयस्क एक मुलगी बसली होती. इअरफ़ोन कानात आणि हातामधे मोबाइल ,मोबाइल मधे ती इतकी गुंतली होती की तिचे बाजूला लक्ष्यही नव्हतं. जणू काही मोबाइल मधे तल्लीन झाली होती. मनाची एकाग्रता कशी वाढवायची या विषयावर त्याने खुप काही ऐकल होत. पण मोबाइल नावाच्या या यंत्रात मानवाला खिळवुन ठेवण्याची जी असीम ताकत आहे ती कुठल्याही योग धारणेत आढळणार नाही, असे तिच्याकडे पाहिल्यावर त्याला वाटले . त्याने मागे वळुन कंडक्टरकडे पाहिले .कंडक्टरने त्याला हातानेच इशारा करुन तिथेच बसन्यास सांगितले. तो थोडासा सावरतच सीटवर बसला. आणि ती अचानक शुद्धिवर आल्यासारखी ताडकन उठली,आणि तिने कंडक्टर ला जोरात हाक मारली. कंडक्टर धावतच तिथे आला . तिच्या शेजारी जो बसला होता त्याला नेमकं काय झालय हेच कळेनासे झाले.
             कंडक्टरला तिने विचारले "तुम्ही म्हणाला होतात की बाजूला लेडीज सिट आहे म्हणून", त्यावर कंडक्टर म्हणाला "हो होती ना पण कैन्सल झाली म्हणून याना दिली थोडे सांभाळून घ्या मैडम" .ती थोडीसी वैतागतच खाली बसली. कंडक्टरने त्याच्याकडे तिकीटाचे पैसे मागितले . त्याने चारशे रुपये पकिटातून काढून त्याला दिले. ती हे पाहून कंडक्टरला म्हणाली हे काय मझ्याकडून तुम्ही साढेचारशे रूपये घेतलेत .तुमची विंडोसिट आहे म्हणून साढेचारशे,  नको का विंडोसिट ? कंडक्टरने उलट तिलाच सवाल केला. ती वैतागतच ठीक आहे म्हणाली . कन्डक्टर तिथून निघुन गेला . त्याने सिटवर डोके टेकले . तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी समोर लावलेली पाटी त्याला दिसली .त्यातील 'सुखाचा' हा शब्द त्याला अडगळनीचा वाटला .त्याने तिला विचारले  "कोल्हापुर का?" .ती "हो" म्हणाली ."एकटयाच चाललाय? "त्याने तिला विचारले .ती त्याला म्हणाली "माझे घर कोल्हापुरला आहे. मी इथे इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आजच शेवटचा पेपर झाला ,म्हणून निघालेय गावी .आईबाबा सकाळच्या गाडीनेच ये म्हणालेले, पण मीच निघालेय". शाळा कॉलेजसाठी आईवडीलापासून दूर होस्टेलवर राहनारी मुले पूर्ण वर्ष काढतील पण शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच बैग पैक करुन ठेवतील पेपर दिला रे दिला की मिळेल त्या गाडीने आपआपल्या गावाची वाट धरतील. कारण त्या नंतरचा प्रत्येक  क्षण त्याना त्या काढलेल्या वर्षापेक्षाही मोठा वाटतो.
                   "तुम्ही फार धाडसी आहात?" तो तिला म्हणाला ."होवावेच लागते धाडसी ,पर्यायच नाही" तिने टोला लगावला. "मग ,इंजिनीरिंग तुमचे आवडते फिल्ड असनार?" त्याने तार छेडली. ती म्हणाली "स्कोप आहे खुप या फिल्ड ला?"......"हो"......"आणि खुप पैसा पण आहे" त्याने तिचे वाक्य पूर्ण केले. "थोडेसे परसेंटेज कमी पडले नाही तर बाबा मेडिकलसाठी पर्यत्न करत होते" पुढे ती म्हणाली. "म्हणजे बाबांच्या चॉइसवरुन तुम्ही करियर निवडले तर ?"तो तिला म्हणाला...."हो ना".. ती म्हणाली आणि हल्ली सर्वांचीच पहिली पसंती मेडिकल नाहीतर इंजीनियरिंगला असते". तो तिच्याकडे पाहुन हसला ,आणि म्हणाला "म्हणूनच आपल्याकडे क्वचितच एखादा तेंडुलकर,कुसुमाग्रज,लता मंगेशकर,किंवा अब्दुल कलाम होतो ,डॉक्टर आणि इंजीनियर मात्र खुप होतात".त्याचे हे बोलने ऐकून तिच्या डोक्यात घंटानाद झाला.ती क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली.तिच अस एकटक पाहण त्याच्या मनावर गुदगुदल्या करुन गेल. ती सावरली आणि मान हलवत "राईट " म्हणाली.कारण त्याने अशा थोर व्यकतीमत्वाची नावे घेतली होती की, त्यांच्यापुढे तिला सर्व काही शुल्लक वाटत होते.ती विचारात मग्न झाली.
                तिच्या त्या चिन्ताक्रांत चेहर्याकडे  पाहुन तो म्हणाला काही चुकले का माझे? ती हसूनच नाही म्हणाली.बस एका स्टॉप वर थाबली .खिडकी बाहेर पाण्याच्या बाटल्या विकनारा तिला म्हणाला "थंड पानी हवय का मैडम वीस रूपए बाटली" .तिने त्यांच्याकडून एक बाटली घेतली आणि शंभर रुपयांची नोट पुढे केली.त्याने तिच्याकडे वीसरुपये सुट्टे मागितले .तिने नाही म्हटले .त्यावर तो म्हणाला "तुमच्याकडे नाहीत तर साहेबाकडून घ्या ", हे ऐकून त्याने त्या पनिवल्याला  विस रूपए  देऊ केले .ती त्याला म्हणाली "मी तुमचे पैसे पुढच्या स्टॉपला सुट्टे झाले की देते" .तो तिला म्हणाला "असुदेत नाही दिले तरी चालतील" .बस  मार्गस्थ झाली. बसची लाईट बंद झाली. ती थोड़ी बावरली,  हा अंधाराचा फायदा तर घेणार नाही ना? अशी स्रीसुलभ भावना तिच्या मनामधे उमटली .पण का कुणास ठाऊक तिला तो तसा वाटत नव्हता? या क्षणभराच्या प्रवासात तिचा त्याच्यावर विश्वास जडला होता.तरी पण ती थोडी खिडकीकडेला सरकली .दोघामधे एक वितेचे अंतर होते. तिने आपली लेडीज बैग दोघामधे ठेवली.
                  तिने इयरफोन कानास लावला व मोबाइल वरील गाणी ऐकत डोळे मिटून घेतले. त्यानेही आपला मोबाइल काढला व फेसबुक चाळू लागला. अंधारातुन पुढुन येणाऱ्या गाड्याच्या हेडलाइटचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. आणि त्या अधुनमधुन पडणार्या प्रकाशात तो तिला नेहाळत होता.तिचा चेहरा जणू त्याला ढगाआड लपणाऱ्या चंद्रागत भासत होता.तो तिच्यात गुंततच चालला होता. क्षणभर त्याला वाटले की तिला तिचे नाव विचारावे व तिला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करावी.....पण त्याने स्वताला आवरले. ती निद्रेच्या अधीन झाली होती. तो तिच्याकडे पाहत होता . तिच्या केसाची बट तिच्या गालवर रुळट होती. ती तिची झोपमोड़ करेल असे त्याला वाटले.त्याने मनाशी धाडस करुन थरथरत्या हाताने तिच्या केसाची बट मागे केली.दोघाच्या मधे असणाऱ्या त्या लेडीज बैग कडे बघत तो मनातल्या मनात हसला .व तो ही झोपी गेला.बस रस्ता कापण्याचे काम करत होती.बस मधील इतर प्रवाशीही गाढ झोपले होते. तो झोपेत तीचेच स्वप्न पाहत होता .तिच्याबरोबर प्रणयाची चित्र रंगवत होता.त्याला त्याच्या खांद्यावर कसलेतरी ओझे जाणऊ लागले .त्याने डोळे उघडुन पाहिले झोपेत तिन तिच डोक त्याच्या खांद्यावर ठेवले होते.त्याला तिला उठवावेसे वाटले .पण त्याला तिची झोप मोड करायची नव्हती.झोपेतला तिचा तो निरागस चेहरा त्याचा मनावर भुरळ पाडून गेला.तो तिला न उठवताच पुनः झोपी गेला.बस रस्त्यावरील खड्डयामुळे थोडीसी हादरली. त्यामुळे तिला जाग आली.तिने पाहिले तिच डोक त्याच्या खांद्यावर होते.तिने स्वताला सावरले व पुनः खिडकी कडेस सरकुन बसली . तिन त्याच्याकडे पाहिल, तो झोपेत होता.ती खिडकीतुन बाहेर पाहु लागली . बाहेर पहाटेचा मंद प्रकाश अंधारावर आपले साम्राज्य पसरवत होता.कोल्हापुर काही अंतरावर होत.
               कंडक्टर ने आवाज दिला."उठा कोल्हापुर आल".प्रतेकाने आपले सामान बरोबर घ्या.नंतर तक्रार ऐकली जाणार नाही".या आवाजाने त्याला जाग आली.त्याने डोळे उघताच तिच्याकडे पाहिले.ती खिडकीतून बाहेर पाहत होती. त्याने पायाखालची बैग उचलून बाहेर घेतली.तिने ही आपली बैग आवरली.तो तिला म्हणाला "झोपेत कधी कोल्हापुर आले हे कळलच नाही".ती त्याच्याकडे पाहून म्हणाली "हो ना झोपेत काही कळलच नाही".तिच्या बोलण्यातील उपरोधिकपना त्याला जाणवला .त्याने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले.पण तिने हसन्याचे टाळले.तिच ते गप्प बसन त्याचा मनाला लागुन गेल. तो काही बोलणार इतक्यात बस थांबली. कन्डक्टर ने आवाज दिला "चला उतरा कोल्हापुर आल".सर्व प्रवासी उतरण्यासाठी गडबड करु लागले.त्यानेही आपली बैग उचलली ,तिच्याकडे पाहत मंद पाऊले टाकत तो बस मधुन खाली उतरला . खाली उतरल्यावर तो तिथेच थाबुंन तिच्या उतरण्याची वाट पाहत होता.ती बस मधुन उतरली व समोर उभ्या असणाऱ्या मानसाकडेेे पाहून हसली. कदाचीत ते तिचे वडील असावेत असा यास त्याने बाधला.त्या माणसाने तिच्याकडची बैग घेतली.व ती त्याच्या बरोबर चालू लागली.तो तिच पाठमोर जाण टक लाऊन पाहत होता.त्याला असे वाटत होते की, कदाचीत ती मागे वळून पाहिल.या आशेवर तो तिथेच उभा होता.आठ तासांच्या प्रवासात त्याला साधे तिचे नाव सुद्धा माहित नव्हते.तरी तो तिच्यात गुंतला होता.तिच चालन शुरूच होत.आणि तो ते पाहत होता.ती थोड्या अंतरावर जाऊन थांबली. याच्या हृदयाची धडधड वाढली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मनात आनंदाचे कारंजे फुलले.
                  ती परत फिरली. ती त्याच्या दिशेने येऊ लागली.तो तिच्याकडे पाहतच राहिला.तिच परत येण म्हणजे त्याच्या जीवनाला मिळणार नव वळण होत.त्याची नजर फक्त तिच्यावर खिळुन होती . तिच्या कडून ते शब्द ऐकन्यासाठी त्याचे कान आसुसले होते.ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याच्यासाठी हा त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता.ती त्याच्यासमोर उभी होती आणि तो तिला पाहत होता.त्याच्या तोंडातून शब्द फूटत नव्हते.शेवटी तीच म्हणाली "हे घ्या तुमचे वीस रूपये सॉरी हं विसरले पुढे गेले आणि लक्षात आले. बाबाकडून कडुन घेतले मागुन माझ्याकडे सुट्टे नव्हते. तो काहीच बोलला नाही.निशब्द पूतळ्यासारखा उभा होता. तिने वीस रूपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघून गेली.त्याच्याकडे तिच्याकडे पाहन्यावाचुन दूसरे काहीही नव्हते. त्याने स्वताला सावरले आणि वर आकाशात पाहत छातीवर हात ठेऊन एक लाब श्वास घेतला व स्वतःशीस म्हणाला .....सावर रे......सावर रे.....

                                 @ अशोक मटकर