Tuesday 24 March 2015

नात तुझ माझ

नात तुझ माझ
कुणा नाही कळल
जिवनाच्या पुस्तकातील
पान हे हळव

मनामध्ये रुतला होता
नजरेचा काटा
समाजाच्या भयापोटी
दुभंगल्या होत्या वाटा

मुक झालेले शब्द
कधी नाही आले ओठी
मनातल्या मनात दडपली
गेल नवी नाती

दोन वेगळ्या वाटांचे
आपण दोघे वाटसरू
तु धरणी मी आभाळ
भेट होई क्षितिजावरी

क्षितिज म्हणजे भास
कल्पनेतला विलास
कधी झाली का भेट
धरणी-आभाळाची
तस नात तूझ माझ

अजुनही आठवतय
तुझ ते पाठमोर जान
अन् क्षणभर थांबुन
नकळत मागे वळुन पाहन

ओठ नाही हलले
शब्द नाही कळले
फक्त तुझे नयन बरसले

बरसणार्या आसवाची
कुणा कळली नाही खंत
असा झाला एका कहाणीचा अंत

                                  -अशोक मटकर

No comments:

Post a Comment